सात जुलै रोजी विधिमंडळात गुलामनबी सरकारला विश्वास मत सिद्ध करायचे असून, यापूर्वी काश्मिरात जोरदार घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप पीडीपीने केला आहे.
मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या आदेशांवरून कॉग्रेस, आमदारांना विकत घेत असल्याचे पीडीपीने म्हटले आहे.अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेल्या वनजमीनीवरून पीडीपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आझाद सरकार अल्पमतात आले आहे.यानंतर सात जुलै रोजी सरकारला विधिमंडळात बहुमत सिद्ध करायचे आहे.
|