देशात कृषीक्षेत्राच्या संथ विकासावर चिंता व्यक्त करताना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी धोरणकर्त्यांना कृषीस देशविकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याची सूचना केली.
कृषी अर्थविकासाचा संथ दर धोरणकर्ते व संधोधकांसमोरील आव्हान असल्याचे त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्थापनादिनी बोलताना व्यक्त केले.
कृषी क्षेत्रातील विकासास चालनेसाठी सतत उत्पादन वृद्धी साधून दुसरी हरितक्रांती घडवून आणणे आवश्यक आहे. यास कृषी जैवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास सदारहीत हरितक्रांती साध्य होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
|