परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी जागतिक समुदायाला विशेषतः अणू पुरवठादार समुहाला (एनएसजी) अण्वस्त्र निर्मिती संदर्भातील भारताचा आजवरच्या रेकॉर्डची आठवण करून देताना भारतावर तीन दशकांपासून लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी केली आहे.
मुखर्जी यांनी असैनिक अणू यंत्रांच्या आंतरराष्ट्रीय देखभालीसाठी वेगळा करार करण्यासही सहमती दर्शविली आहे.
व्हीएन्ना येथे सुरू असलेल्या एनएसजीच्या बैठतीच्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी वक्तव्य केले आहे, की भारत अण्वस्त्रबंदी व्यवस्थेला आणख्ी खंबीर करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा देश आहे. अणू इंधन मर्यादीत ठेवणे आणि त्यासंदर्भातील इतर बाबींसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताचा अणू कराराचा हक्क शाबूत- कॉंग्रेस
भारताची एनएसजीमध्ये परीक्षा
|