राजकीय पुढार्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून शिक्षणाचे महत्त्व समजून घेण्याचा आग्रह मद्रास विद्यापीठाच्या 150 व्या वर्धापन दिनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी बोलताना धरला.
ते म्हणाले की, आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन साम्रगीपर्यंत पोहचलो आहे. देशाची प्रगती, विकास व येणारी संधी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण दिले गेलेच पाहिजे. विकासकार्यात समाज्यातील प्रत्येक वर्ग जोपर्यंत सहभागी होत नाही तोपर्यंत भारताची प्रगती नाही़, असेही ते म्हणाले.
|