मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या पी. चिदंबरम यांनी देशापुढील गंभीर आव्हानांचा निर्धाराने सामना करण्यात येईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
धर्मनिरपेक्ष, बहुसांस्कृतिक देशापुढील दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. दहशतवाद देशाच्या संकल्पनेसच आव्हान देत आहेत. मात्र अंतिम विजय देशाचाच होईल, याबाबत आपणास शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून टीकेचे धनी ठरलेल्या शिवराज पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर याअगोदर वित्तमंत्रालय सांभाळणाऱ्या पी. चिदंबरम यांनी गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. |