मुंबईत झालेल्या हल्ल्यांतील दहशतवादी मोहंम्मद अझमल कासब याच्या दोन्ही हातात गोळ्या लागल्याने त्याचे दोनही हात निकामी झाले असून, तो या पुढे आपल्या हातात कोणतीही जड वस्तू उचलू शकणार नाही.
मुंबईत गोळीबार कात फिरताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा साथीदार मारला गेला तर कासबच्या हातात गोळ्या घुसल्या. याही परिस्थितीत एखाद्या सुरक्षितस्थळी जाऊन या गोळ्या काढण्याच्या प्रयत्नात तो होत असे त्याने पोलिसांपुढे कबूल केले आहे.
पाकमधून येताना परतीची आशा आपण सोडून दिली होती. हा आत्मघाती हल्ला असल्याचेही त्याने कबूल केले आहे.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यांमध्ये 9 दहशतवादी मारले गेले तर कासबला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. यानंतर कासबने आपले तोंड उघडले असून, त्याने आपल्या आणि आपल्या साथीदारांचे मनसुबे पोलिसांसमक्ष कबूल केलेत. |