झारखंडचे पराभूत मुख्यमंत्री यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असून, त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. जनतेच्या न्यायालयात आपला पराजय झाला असून, आपल्याला हा पराभव स्वीकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पराभूत झाल्याने आपण मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार का नाही हे निश्चित नसून, आपण लवकरच राजीनाम्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर नेत्यांशी संपर्क साधून आपण याचा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. |