भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची रालोआ केंद्रात सरकारमध्ये आल्यास रोजगाराभिमुख आर्थिक विकासास चालना देणार असल्याचे म्हटले आहे.
याचसोबत आरोग्यव्यवस्थेत क्रांतीकारक बदल व युवकांमध्ये स्वयंसेवेच्या वृत्तीस वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सद्या आर्थिक मंदीमुळे सर्वत्र बेरोजगारीचे वातावरण असून तरूण भारतीयांपुढे रोजगाराचे आव्हान निर्माण झाले आहे.
आर्थिक उदारीकरण्याच्या कालखंडात देशाने सकल राष्ट्रीय उत्पन्नात तुलनात्मकदृष्ट्या अधिक दर कायम केला आहे. मात्र यामुळे रोजगाराच्या संधीत त्याप्रमाणात वृद्धी झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दहशतवादासोबतच आर्थिक जीवनातील सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले. |