केंद्रीय वाहतूक मंत्री टी आर बालू यांच्याशी चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर देशातील ट्रक मालकांनी आपला संप आज मागे घेतला आहे.
सेवा करात सवलत देण्यात यावी, ट्रक टायरचे दर कमी करण्यात यावेत, सहा महिन्यांचे कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे अशी मागणी करत देशभरातील ट्रक मालक संपावर गेले होते.
ट्रक मालकांपाठोपाठ देशातील सार्वजनिक कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी संप पुकारल्याने देशात हाहाकार माजला होता.यानंतर आज बालू यांच्याशी ट्रक मालकांनी चर्चा केल्यानंतर आपण संप मागे घेत असल्याची घोषणा केली. |