एकीकडे कोणतीही दरवाढ न करता रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आदर्श अर्थसंकल्प मांडल्याचे सांगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममतांना शाबासकीची थाप दिली आहे.
ममतांनी कॉग्रेस आणि आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तर केलीच आहे, परंतु अनेक नवीन घोषणा करत हे सरकार सामान्यांचे असल्याचे स्पष्ट केल्याचे मनमोहन म्हणाले.
50 रेल्वे स्टेशन्सला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची त्यांची घोषणा कौतुकास्पद असल्याची पावतीही मनमोहन यांनी ममतांना दिली. |