ओरिसातील कंधमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या दंगलींचे मुख्य कारण धर्मांतर होते असा खुलासा या दंगलींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने केला आहे.
या दंगलीत 43 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याप्रकरणी न्यायमूर्ती एस सी मोहपात्र यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
कंधमाळमधील आदिवासींमध्ये अनेक गैरसमज होते, यातच त्यांचे धर्मपरिवर्तन करणे आणि पुन्हा त्यांना आधीच्या धर्मात घेण्याचे प्रकार घडल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आणि या दंगली उसळल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. |