जम्मू-काश्मीरमध्ये प्री-पेड मोबाईल कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मोबाईल घेताना योग्य ओळखपत्र जमा न करताना बनावट कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर प्री-पेड मोबाईलधारक असून, त्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे. आगामी काळात कोणत्याही मोबाईल कंपनीने राज्यातील ग्राहकांना प्री-पेड कार्ड देऊ नये असे आदेश सरकारने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.