जयपूरच्या इंडियन ऑईल डेपोला लागलेली आग विझवणे किंवा नियंत्रणात आणण्याचे सर्व उपाय फोल ठरले असून आता जेव्हा कंटेनरमधील पेट्रोल संपेल आग आपोआप विझेल याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी स्पष्ट केले आहे.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आग केव्हापर्यंत आटोक्यात येईल असा प्रश्न त्यांना विचारला असता देवरा यांनी सांगितले, की आग अतिशय भयावह असून ती आटोक्यात आणणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे आता पेट्रोल संपण्याची वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नाही. केंद्र प्रशासनाच्या संपर्कात असून आगग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.