नवी दिल्ली, गुरूवार, 5 नोव्हेंबर 2009( 21:28 IST )
राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी शनिवारी होणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंधराव्या दिवशी कॉंग्रेसतर्फे यासंदर्भात घोषणा करण्यात आली.
राज्यातील सरकारस्थापनेच्या आणि खातेवाटपाची बोलणी पूर्ण झाली असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता झाली असल्याचे श्री.पटेल यांनी सांगितले. यासंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील आणि अंतिम निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. अँटनी यांनी दिली.