पाकिस्तानच्या लष्करी छावण्यांमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत पाककडून दहशतवादाविरूध्द निष्पक्ष लढ्याची अपेक्षा करणेच फोल असल्याचा आरोप संरक्षण मंत्री ए.के.एंटनी यांनी केला आहे.
एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना एंटनी म्हणाले, की पाकमधील अंतर्गत स्थिती पूर्णतः ढासळली असून हे केवळ पाकसाठीच नव्हे तर जगासाठीही धोकादायक आहे. भारताला पाकमध्ये स्थिरता हवी आहे. त्यासाठी तेथील दहशतवादी अड्डे नष्ट करण्याची गरज आहे. मात्र जिथे सैन्याच्या छावण्यांमध्येच दहशतवादी अड्डे चालतात तिथे दहशतवादाविरुध्दच्या लढ्याची अपेक्षा कशी करता येईल.