भाजपशासित कर्नाटकातील नेतृत्वबदलाच्या मागणीने उत्पन्न झालेला पेचप्रसंग मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना हटविण्यासंदर्भात आपली भूमिका कायम ठेवली आहे, तिकडे युडीयुरप्पा मात्र वाद मिटल्याचे सांगत आहेत.
येडीयुरप्पांनी आपणच मुख्यमंत्रिपदी रहाणार असल्याचे सांगून आता कोणताही वाद राहिला नसल्याचे सांगितले. पण लगेचच तिकडे रेड्डी यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या मागणीवर कायम असल्याचे सांगितले. पक्षहितास्तव, राज्याच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांची इच्छा लक्षातघेऊन पक्ष नेतृत्व योग्य आणि अचूक निर्णय घेईल, अशी आशा रेड्डी यांनी व्यक्त केली.
नेतृत्वबदलासंदर्भात समझौता झाल्याचे वृत्त फेटाळून लावत येडीयुरप्पा यांना हटविण्याच्या मागणीवर आपण अजूनही कायम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.