आसाममधील नलवाडी जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशन समोर आणि गोपाल बाजार येथे झालेल्या सायकल बॉम्ब स्फोटात पाच जण ठार तर 35 जखमी झाले आहेत. सायकलच्या सीटखाली टाईमर लावून हा स्फोट घडवून आणण्यात आला असून उल्फा या दहशतवादी संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
स्फोटातील जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेनंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली असून पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून प्रत्येक संशयिताची कसून चौकशी केली जात आहे.