शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आता विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी तोंडसुख घेतले आहे. शिवसेनेत दम नसल्याचे सांगतानाच बाळासाहेबांनी बाबरी पाडलीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ठाकरेंमध्ये साहस नाही. ते त्यांच्यात असते तर ते बाबरी पाडण्यासाठी अयोध्येत गेले असते. ते कधी अयोध्येत गेले नाहीत. आणि बाबरी मशीद पाडण्यात त्यांचा अथवा कोणत्याही शिवसैनिकाचा हात नसल्याचे सिंघल यांनी म्हटले आहे.
एकीकडे शिवसेनाप्रमुखांवर टीकेची झोड उडवतानाच दुसरीकडे सिंघल यांनी राज ठाकरे यांच्या धोरणावरही टिका केली. राज आपल्या मुद्द्यांपासून भटकत असून, त्यांना सद्बुद्धी मिळो असेही ते म्हणाले.
वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहे. याला विरोध करणे चुकीचे असून, देशाचे शत्रूच फक्त याचा विरोध करू शकतात असे सिंघल म्हणाले.