नवी दिल्ली , सोमवार, 23 नोव्हेंबर 2009( 13:31 IST )
इंडीयन एक्सप्रेसने लिबरहान आयोगातील महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केल्याने देशभर पुन्हा एकदा बाबरी मशीद प्रकरणी वादंग माजला आहे. आता अहवालात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव नसल्याचा दावा लिबरहान आयोगाचे वकील अनुपम गुप्ता यांनी केला आहे.
बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी आयोगाने अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी यांना दोषी ठरवल्याचे एक्सप्रेसने आपल्या वृत्तात स्पष्ट केले आहे.
यानंतर आज सकाळपासूनच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले असून, अहवाल संसदेत सादर होण्यापूर्वी लिक कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यानंतर आयोगाचे वकील अनुपम गुप्ता यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आयोगाने अडवाणींना दोषी ठरवलेच नसल्याचे म्हणत आणखी एक वाद जन्माला घातला आहे.