बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी गठित करण्यात आलेल्या लिबरहान आयोगाचा अहवाल संसदेत सादर होण्यापूर्वी मीडियामध्ये लीक होण्यामागे संपुआ सरकारचा कट असून देशातील महत्वाच्या मुद्यांपासून जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठीच हा अहवाल उघड केला गेला असल्याचा आरोप भारतीय जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षा उमा भारती यांनी केला आहे.
बेरोजगारी, गुणवत्ताहीन महाग शिक्षण, महागाई, मुंबई हल्ल्याच्या एक वर्षपूर्ती सारख्या प्रमुख मुद्यांकडून दुर्लक्ष करण्यासाठी सरकारने हा अहवाल लीक केल्याचा आरोप उमा भारती यांनी केला आहे.