सोमवार रात्री पासून मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच ठाणे आणि मुंबईत घडलेल्या विविध घटनांमध्ये तिघांचा बळी गेला.
बृहन मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बोरिवली येथील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला असून, कांदिवलीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एक मुलगा बेपत्ता आहे.
ठाण्यात एका घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे.
|