सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी होणा-या या अधिवेशनात येण्यास जनतेचे प्रतिनिधीच नाखूश असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या प्रकरणाची मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून सभागृहात अनुपस्थित असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार अधिवेशन काळात सभागृहात गैरहजर राहणा-या मंत्र्यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
|