मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा, वैतरणा आणि इतर धरणांतील पाणीसाठा घटल्याने मुंबई महापालिकेने शनिवारपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या धरणांमध्ये सध्या केवळ 25 टक्के पाणी साठा आहे.
सध्या असलेल्या पाण्याचा विचार करता मुंबईला केवळ 20 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. सुरुवातीला 15 टक्के पाणी कपात केली जाणार असून आवश्यकता वाटल्यास त्यात वाढ करण्याचेही संकेत देण्यात आले आहे. यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने उन्हाळयात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
|