ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आणि त्याची व्याजासह परतफेड केली अशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विशेष घोषणा केली असून, त्यांना त्यांचे व्याजाचे पैसे परत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज केली.
कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, केंद्राने विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाच्या व्याजाची परतफेड केली अशा 26 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकरी राज्य सरकारवर नाराज असून, त्यांच्यासाठी या विशेष पॅकेजची अंबलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचेही विलासराव यांनी स्पष्ट केले आहे. |