नाशिक मधील अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मालेगाव स्फोटात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसने या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या अध्यक्ष हिमानी सावरकर यांनी स्फोटात सहभागी असलेल्यांचे समर्थन केले असून, त्यांच्यासह या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. |