'भैय्या हातपाय पसरी' या नाटकावर बंदी घातलेली नाही आणि ती घालण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने 'देशद्रोही' या चित्रपटावर बंदी घातली असून त्या पार्श्वभूमीवर 'भैय्या...' या नाटकावरही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी नाटकांची संहिता नाट्य सेन्सॉर बोर्डाकडून मागवून घेतली होती. दरम्यान, या नाटकावर कोणतीही बंदी लागू होणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. |