दहशतवाद विरोधी पथकाचा (एटीएस) तपास कायदेशीर आणि नियमांनुसारच सुरू आहे. तपास यंत्रणेवर केलेल आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
तपास यंत्रणेसाठी असलेल्या नियमांना धरूनच हा तपास सुरू असल्याचे सांगून त्यांनी एटीएसने शिवसेना व भाजपच्या शासनकाळातही अनेक गुन्ह्यांचा तपास केल्याची आठवण करून दिली. |