मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर राज्यात सुरक्षाव्यस्थांचे बारा वाजल्याचे सिद्ध झाले असून, असे सरकार बर्ख्रास्त करून राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी शिवसेनेने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेटून केली आहे.
आज राष्ट्रपती मुंबईत असून, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी पाटील यांची भेट घेतली.
मुंबई हल्ल्यांची माहिती सरकारला यापूर्वीच मिळाली असतानाच सरकारने कोणतीही कारवाई न केल्याने या हल्ल्यात निरपराध्यांचा मृत्यू झाल्याचे सेनेने म्हटले आहे. |