मुख्य पृष्ठ > धर्म > श्रद्धा -अंधश्रद्धा > लेख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रूपाल पल्लीत वाहते तुपाची नदी
अक्षेश सावलिया

रामराज्यात तुपाची नदी वाहायची हे आतापर्यंत आपण आजी आजोबांच्या गोष्टीत
ऐकत आलो आहोत. पण कलियुगातही अशी तुपाची नदी वाहते असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल?

Rupal Mandir
WDWD
मग चला गुजरातमधील रूपाल नावाच्या गावाला. या गावात पल्ली नावाच्या देवतेचे मंदिर आहे. या देवीला दरवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तुपाचा अभिषेक केला जातो. या प्रथेमागचे इंगित जाणून घेण्यासाठी आम्ही यावेळी श्रध्दा व अंधश्रध्दा या सदरासाठी या गावाचा दौरा केला. आम्ही भेट दिली त्या दिवशीच भाविकांनी पल्ली मातेला सहा लाख किलोपेक्षा जास्त तुपाने अभिषेक केला. म्हणजे जवळपास दहा कोटी रूपयांचे तूप अक्षरशः वाया गेले.

Rupal devi
WDWD
रूपाल गावात दरवर्षी नवरात्रौत्सवात नवव्या दिवशी आदिशक्ती वरदायनी देवीची यात्रा भरते. त्यासाठी लाखो भाविक येतात. देवीला तुपाने अभिषेक घालतात. असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल, अशी त्यांची श्रध्दा असते.

आम्ही रूपाल गावात गावात पोहोचलो तेव्हा जागोजागी भाविकांची गर्दी होती. गावातील सरपंचांशी बोलल्यानंतर कळले, की येथे जवळपास दहा लाख भाविक आले आहेत. गावातील प्रत्येक घरात वीस ते पंचवीस पाहुणे या यात्रेसाठी आलेले आहेत. आम्ही पोहोचलो तेव्हा, देवीला नैवेद्य दाखविण्यात येणार्‍या खिचडी तयार करण्याची वेळ झाली होती. यात्रेला 3.30 वाजता सुरूवात झाली. यात्रेदरम्यान 27 रस्त्यांवर बादल्या भरून तूप ठेवलेले होते. भाविक बादल्या भरून भरून पल्लीमातेला अभिषेक करत होते. वरदायिनी देवसंस्थेचे संचालक नितीनभाई पटेल यांनी सांगितले, की गेल्या वर्षी सव्वा चार लाख किलो तुपाचा अभिषेक करण्यात आला होता. या वर्षी हे प्रमाण वाढून सहा लाख किलो झाले आहे.

devi
WDWD
देवीला तुपाचा अभिषेक केल्याने संकट दूर होऊन सुख प्राप्त होईल या भाबड्या श्रद्धेपायी लोक मोठ्या प्रमाणात मुलांना दर्शनासाठी घेऊन येतात. गावातील लग्न झालेल्या मुली व जावईही यादिवशी दर्शनासाठी येतात. देवीकडे आपण मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. पुत्ररत्नानाची अपेक्षा असणार्‍यांना पुत्राची प्राप्ती होते. ज्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतात ते देवीला तुपाचा अभिषेक करतात.

अभिषेक केल्यानंतर येथील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत तूप वाहू लागते. हे तूप फक्त वाल्मिकी समाजातील लोकच गोळा करतात. तूप गोळा केल्यानंतर ते साफ करून त्याची मिठाई तयार केली जाते आणि बाजारात विकली जाते.

पौराणिक कथेचा आधार रूपाल येथील यात्रेला पौराणिक कथेचा आधारही आहे. पांडवांनी द्रौपदीसोबत रूपाल गावापासून वनवासाची सुरवात केली होती. एक वर्षांच्या अज्ञातवासात आपण पकडले जाऊ नये यासाठी पांडवांनी वरदायिनी देवीची करूणा भाकली होती. एक वर्ष निर्वेधपणे पूर्ण झाल्यानंतर पांडवांनी सोन्याची पल्ली बनवून त्यावर शुध्द तुपाने अभिषेक केला होता. व यात्रा काढली होती.
व्हिडिओ पाहा
1 | 2  >>  
फोटो गॅलरी
फोटोगॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा...
आणखी
अश्वत्थामा कोण ?