मुख्य पृष्ठ > धर्म > सण-उत्सव > गुरूपौर्णिमा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा  Search similar articles

guru
ND
श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही त्यांचा उपदेश महाराष्ट्राला जागृतीचे धडे देत आहे. गुरू पुष्कळ असतात, पण जो गुरू आत्मज्ञानाचे दर्शन घडवून देतो तोच खरा गुरू असे शास्त्र सांगते. सर्व काही नष्ट झाल्यावर जे उरते तोच आत्मा. त्या आत्म्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्याच परब्रह्माचे दर्शन श्री समर्थांनी महाराष्ट्राला करून दिले आहे. श्रीमंत दासबोधात त्याचा ठिकठिकाणी प्रत्यय येतो.

जे जे यातीचा जो व्यापरु। ते ते त्याचे तितिके गुरु।
याचा पाहता विचारु। उदंड आहे।
असो ऐसे उदंड गुरु। नाना मतांचा विचारु।
परी जो मोक्षाचा सदगुरु। तो वेगळाची असे

श्री समर्थांचा दासबोध हा गुरुशिष्याचा संवाद आहे. श्रीसदगुरुचरणी अनन्यभाव ठेवावा अशी समर्थांची शिकवण आहे. सद्गुरू म्हणजे माणसाला संसाररूप सागरातून तरून जाण्यास मदत करणारा संत होय. जन्म-मरणाची यातायात कायम तुटावी म्हणून सद्गुरूशी अअन्य होणे आवश्यक आहे. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की सहजस्थिती प्राप्त होते. मग अलिप्तपणाने जगता येते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जीवनातील सुखदू:खाला सहजपणे जिंकता येते. मन शुद्ध होते. सद्गुरूच्या सहवासात राहून त्यांची सेवा केल्याने त्यांच्या निरनिराळ्या गुणांचे ज्ञान आकलन होते. श्री समर्थ राष्ट्रगुरू होते व आजही त्यांच्या दासबोधाच्या रूपाने ते जिवंत आहेत.

श्री समर्थांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात जे जे अनुभवले ते सर्व त्यांनी आपल्या वाङ्मयात लिहून ठेवले आहे. मानवी समाज अफाट आहे. आपल्याला मिळालेले अनुभव व ज्ञान भाषाबद्ध करून ठेवावे. ज्याला आपली उन्नती करून घ्यायची असेल तो त्या लिखाणातून करून घेऊ शकतो. श्री समर्थांनी स्वत: आपल्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग केलेत व जगातील मानवी जीवनाचा अर्थ शोधून काढला. त्यांचे अनुभवविश्व मोठे होते. व्यापक होते, ते आजही ताजे, अति-जिवंत आणि रसरशीत आहे. त्यांची बुद्धी सूक्ष्म होती तशीच प्रतिभा जागृत होती. त्यांनी आपले जीवनदर्शन त्यांच्या दासबोधात भाषाबद्ध केले आहे. दासबोधाचा अभ्यास करून माणूस संसार सफल करून घेऊ शकतो. त्याकरिता त्याने ज्ञानदृष्टीचा लाभ करून घ्यावा. तो करण्याकरीता मनन हा विवेकाचा मार्ग आहे. सतत श्रवण मनन करून ज्ञान प्राप्त होते, अज्ञान नाश पावते. अखेर मनाचे उन्मन होऊन ज्ञानेचे विज्ञान होते अभंग समाधान प्राप्त होते. असा हा दासबोधाचा अभ्यास साधकाला ब्रह्मज्ञानी करू शकतो. त्याचा अनुभव साधकाने स्वत:चला स्वत:च घ्यायला हवा, असे श्री समर्थ सांगतात, 'जीवनाचे नैराश्य घालवून चैतन्य उत्पन्न करणारी' दासबोधाची शिकवण आहे.
1 | 2  >>  
आणखी
महंते महंत करावे!
समर्थ रामदास स्वामी
जागरूकता
ग्रामीण उत्कर्षासाठी ज्ञानदीप विद्यावर्धिनी
॥ गुरुवर अष्टक ॥
॥ गुरुतत्वविवेचनम्‌ ॥