श्रावणभक्तीने पाप जळून जातात. मनाची धूळ धुतल्या जाते आणि परमात्म्यावरील प्रेम जागे होते.
सांदीपनीऋषींच्या आश्रमात विद्यार्थी खुष होते. पण कृष्णाची मैत्री सुदाम्याशी होती. सुदामा म्हणजे सुयोग्य संयम, अशा सुदाम्याशी मैत्री केली तर ती मैत्री श्रीकृष्णाप्रमाणे जीवनात साफल्या प्राप्त करते. लहानपणापासून संयम करणार्याच्या जीवनात विद्या टिकते. विलासाने विद्या भस्म होते. आजकाल विद्यालय विलासधाम झाले आहेत. वेदान्त शिकविणारा प्राध्यापक सिगरेट ओढतो तेव्हा विद्यार्थ्यावर कोणते संस्कार करणार? म्हणूनच म्हणतात की जे अापल्या आचरणाने उपदेश करतात ते खरे गुरु. केवळ वाणीने उपदेश देणारा गुरूपद भूषवू शकत नाही.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद) अनुवादकः सौ. कमल जोशी
|