आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने 20 वर्ष पूर्ण केली. त्यामुळे त्याला 20 वडापाव देऊन शिवाजी पार्क मैदानावरील आठवणी जाग्या करणार असल्याचे भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज विनोद कांबळी याने सांगितले.
भारत आणि श्रीलंकेविरुद्ध 24 नोव्हेंबरपासून सुरु होणार्या कसोटी सामन्याची तयारी जोरात सुरु आहे. स्टेडियमच्या जवळपास फिरणार्या बेवासर कुत्र्यांना पकडण्याची मोहीम महानगरपालिकेने सुरु केली आहे. जिल्हा प्रशासनाने स्टेडियमवरील मधमाश्यांचे पोळ काढण्यास सुरवात केली आहे.