श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकण्याबाबत कर्णधार अनिल कुंबळेने विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय संघ पंचेचाळीस दिवसाच्या श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. याअगोदर बंगळूर येथे कसोटी संघाचे तंदुरूस्ती शिबिर घेण्यात आले आहे.
प्रत्येक कसोटी मालिका ही महत्त्वपूर्ण असून आम्ही विजयासाठीच जाणार आहोत. प्रत्येक मालिका सारख्याच गंभीरतेने खेळणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले. संघनिवडकर्ते यासाठी आठ जुलैला संघनिवड जाहीर करतील.
तेवीस जुलैपासून सुरू होणार्या या मालिकेत तीन कसोटी व पाच एकदिवसीय सामने खेळण्यात येतील.
|