भारतीय संघाचा माजी कप्तान सौरव गांगुलीला भारतीय संघ श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत करून आशिया करंडकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे उटटे काढणार अशी खात्री आहे.
श्रीलंकेत आल्यानंतर येथील माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गांगुलीने विजयाची पूर्ण खात्री असल्याचे सांगितले. आम्ही निश्चितच विजयी होऊन परतू असा विश्वास असल्याचे गांगुलीने माध्यमांना सांगितले.
आमच्याकडे चांगला आणि संतुलित संघ आहे. प्रत्येक संघाविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला आहे. आणि त्यामुळे विजयी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असे गांगुलीचे म्हणणे आहे.
भारतीय संघ श्रीलंकेत तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना येत्या 23 जुलैपासून सुरू होणार असून त्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. शुक्रवारपासून श्रीलंकन बोर्ड एकादशसोबत एनसीसी स्पोर्ट्स क्लब मैदानावर तीन दिवसांचा सराव सामना खेळला जाणार आहे.
|