ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » टीम इंडियासाठी सुरक्षा कठोर
Feedback Print Bookmark and Share
 
मोहालीतील घटनेनंतर टीम इंडियासाठी हैदराबादमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ मंगळवारी हैदराबादमध्ये दाखल झाला.

मोहालीत कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराजसह काही खेळाडू सुरक्षा रक्षकांना चकमा देवून बाहेर गेले होते. त्यानंतर सिकंदराबाद पोलिसांनी भारतीय खेळाडूंची सुरक्षा अधिक कठोर केली आहे. भारतीय खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्ये 50 सुरक्षा कर्मचारी ठेवण्यात आले आहे. आता खेळाडूंना न सांगता बाहेर जाता येणार नाही. खेळाडू बाहेर गेल्यावर तीन पोलिस व्हॅन त्यांच्या बरोबर असणार आहे. तसेच सामन्या दरम्यान दोन हजार सुरक्षा कर्मचारी स्टेडियममध्ये असणार आहे.
संबंधित माहिती शोधा