भारत आणि श्रीलंका यांच्यातील होणारी कसोटी मालिका दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु या मालिकेस अजूनही पुरस्कर्ते मिळाले नाहीत. इतर मालिकांसाठी पुरस्कर्त्यांची रिघ लागल्याचा अनुभवानंतर भारत-श्रीलंका मालिकेसाठी बीसीसीआयला पुरस्कर्ते शोधावे लाग आहे.
मालिकेस पुरस्कर्ते न मिळाल्यामुळे कानपूरमध्ये होणार्या दुसर्या कसोटीची तिकिटे छपाईसही पाठविलेली नव्हती, असे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे संचालक ज्योती वाजपेयी यांनी सांगितले. अखेर पुरस्कर्त्यांच्या लोगोविनाच तिकिटाची छपाई करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश संघटनेने घेतला आहे.