भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमार्फत आयोजित सन 2011 मधील विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांच्या कार्यक्रमाची घोषणा नऊ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली.
विश्वकरंडक स्पर्धेत 49 सामने होणार असून त्यातील 29 सामने भारतात होईल. अंतिम सामना मुंबईत तर एक उपात्यंफेरी मोहालीत तर दुसरी अहमदाबादमध्ये होणार आहे. श्रीलंकेत श्रीलंकेत 12 तर बांगलादेशात आठ सामने होणार आहे. या सर्व सामन्यांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला जाणार आहे.