शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (11:21 IST)

सलमानसोबत काम करण्याबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं सलमानसोबत काम करण्याबाबत मौन सोडलंय. ऐश्वर्या म्हणाली, संजय लीला भन्साळींचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’मध्ये काम करण्याचं तिला जराही खंत नाही. पहिले या चित्रपटात ऐश्वर्या काम करणार होती. हा चित्रपट भन्साळींचा सर्वात खास चित्रपट असल्याचं बोललं जातंय.
 
भन्साळी 1999 मध्ये आलेला चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’च्या यशानंतर ‘बाजीराव-मस्तानी’मध्ये सलमान आणि ऐश्वर्याला मुख्य भूमिकेसाठी घ्यायचं होतं. चित्रपटात आता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आहेत. 
याबाबत ऐश्वर्याला विचारलं असता ती म्हणाली, ‘चित्रपटात सुरुवातीपासून त्यांना खास कलाकारांना घ्यायचं होतं. तसं झालं असतं तर मी मस्तानीच्या रूपात असती. पण असं तेव्हाच झालं असतं जेव्हा त्यांनी विचार केलेला अभिनेता (सलमान खान) बाजीराव असता. ऐश्वर्या म्हणाली, ‘मात्र असं झालं नाही, याबाबत आम्ही चर्चा केली. ही बाब अशी नाहीय की, याबद्दल विचार केला जाईल, काळजी केली जाईल. प्रत्येक चित्रपटाचं भविष्य ठरलेलं असतं, तो तिथेच पोहोचतो जिथं त्याला जायचं असतं.’ 
 
ऐश्वर्या पाच वर्षानंतर संजय गुप्ता यांच्या ‘जज्बा’मध्ये दिसणार आहे. ऐश्वर्या म्हणाली, मी भन्साळींना ‘बाजीराव-मस्तानी’बाबत चिडवलं सुद्धा.. ऐश्वर्यानं भन्साळींच्या दोन हिट चित्रपटात काम केलंय, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’मध्ये ती होती. भन्साळींसोबत माझं जवळचं नातं आहे, असंही ऐश्वर्या म्हणाली.