बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2015 (12:12 IST)

भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही

देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नसल्याचं’ म्हटलं आहे. जर असं असतं तर मी भारताचं नागरिकत्व का मागितलं असतं असंही अदनान सामी याने म्हटलं आहे. भारताचं नागरिकत्व तुम्हाला का हवं आहे असे जेव्हा अदनान यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं ‘प्रेम’. अदनान सामी 2001 पासून व्हिजिटर्स व्हिसावर भारतात राहात आहेत.