स्पर्शाने रोगमुक्त करणारा ब्रह्मगुरू
लोकांची श्रद्धा कधीकधी आपली सीमा ओलांडून अनेकदा इतकी पुढे जाते की आपण अंधश्रद्धेच्या प्रांतात आलोय हे त्यांना कळतही नाही. त्यामुळेच अनेक भाकड वाटणार्या कथांवरही विश्वास ठेवला जातो. कोणत्याही व्याधी किवा रोगावर उपचार करायचा झाल्यास त्यास औषधाशिवाय पर्याय नाही. पण केवळ बोटांच्या स्पर्शाने रोग बरे करण्याचा दावा करणार्या व्यक्तीकडे उपचारासाठी रांगा लागतात हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही खरी बाब आहे. ब्रह्मज्ञानाच्या आध्यात्मिक शक्तीवर आधारीत ही उपचार प्रणाली आहे. त्यासाठी आम्ही आपला मोर्चा केरळकडे वळवला. निसर्गसुंदर अशा या केरळमध्ये आचार्य एमडी रवी मास्तर हे 'ब्रह्म गुरू' आम्हाला भेटले. हे गुरू रोगांवर आपल्या कोमल स्पर्शाने उपचार करतात. विशेष म्हणजे त्यांचे उपचार नि:शुल्क आहेत. एमडी रवी मास्तर कुणी डॉक्टर नाहीत. व्यवसायाने ते शिंपी आहेत. त्यांचे शिक्षणही यथातथाच झाले आहे. पण तरीही ते उपचार करतात. अगदी असाध्य रोगांवरही त्यांना पुनर्जन्मातून रोगांवर उपचार करण्याची विद्या प्राप्त
झाली आहे. या शक्तींचे ज्ञान झाल्यावर सामान्य व्यक्तीसही महान योगीपद प्राप्त होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे उपचार केंद्र ब्रह्म धर्मालय नावाचे प्रसिद्ध आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील चंगनास्सेरी येथे त्यांचे हे धर्मालय आहे. थिरूवनंतपुरम येथून हे ठिकाण साधारणत: 135 किलोमीटर तर कोच्चीहून 87 किलोमीटरवर आहे. आपल्या प्रार्थनेवेळी कोणत्याही देवी-देवतांशी आपण संवाद साधू शकत असल्याचा दावा रवी मास्तर करतात. मात्र, आपण परमेश्वर किवा त्यांचा अवतार नसल्याचीही त्यांना खात्री आहे. त्यांच्या मते लोकांच्या सेवेसाठी त्यांना ही शक्ती प्राप्त झाली आहे. कोणत्याही औषधाशिवाय ब्रह्मज्ञानाच्या आधारे ते उपचार करू शकतात.
कोणत्याही रोगाचा उपचार आपण कोमल स्पर्शाने करतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या हातातून निघणारी ब्रह्मशक्ती रोगांवर परिणामकारक असल्याचा त्यांचा दावा आहे. 'सोरायसिस' सारख्या चर्मरोगावर औषध शोधण्यात आतापर्यंत कुणास यश आले नाही पण रवी मास्तराकंडेही त्याचा उपाय आहे. त्यांच्या ब्रह्म चिकित्सा केंद्रात अनेका मानसिक व शारीरीक व्याधींनी ग्रस्त लोक उपचारासाठी येतात.फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा....
आश्रमात कोणत्याही देवी-देवतांची पूजा-आरती करण्यात येत नाही. त्यांना प्राप्त सर्व व्यापी शक्ती सर्व देवादिकांपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे मानण्यात येते. व्यसनमुक्तीसाठीही दूरवरून त्यांच्याकडे लोक येतात. त्यांच्या हातातून निघणारी उर्जा म्हणे रूग्णांना असह्य होते आणि ते रोगमुक्त होतात, असे बोलले जाते. सर्व व्याधी नकारात्मक प्रवृत्तीचा परिणाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या उपचाराद्वारे ते रोग्यास शांती प्राप्त करून देतात. रवी मास्तर 'ब्रम्ह गुरू' कसे झाले ? रवी मास्तरांचा जन्म 1953 मध्ये कोट्टायम जिल्ह्यातील