भारतासाठी आज 'डू ऑर डाय' सामना
टी-20 मध्ये वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियासाठी रविवारचा सामना 'करा किंवा मरा'चा ठरणार आहे. सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी आज इंग्लंड सोबत होणारा सामना भारताला कुठल्याही स्थितीत जिंकावाच लागणार आहे. वेस्टइंडीजकडून पराभवानंतर भारतीय खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागला होता. विशेषतः कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनेक निर्णयांवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे आजचा सामना महत्वाचा ठरला आहे.