नाणेफेक - बांगलादेशाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
आजचा शेवटचा साखळी सामना भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्याच्या निकालावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचणार की नाही हे ठरणार आहे. त्यामुळेच या सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या सामन्यात बांगलादेश जिंकला तर ते पाकिस्तानबरोबर अंतिम फेरीत खेळतील आणि जर त्यांचा पराभव झाला तर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकेल. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेच्या विजयाचे साकडे घातले आहे. आज लंके विरुद्ध बांगलादेश विजयी झाला तर टीम इंडिया आणि बांगलादेश यांचे समान ८ गुण होतील. साखळी सामन्यात बांगलादेशाने टीम इंडियाला पराभवाची धुळ चारल्याने त्यांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.