शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , मंगळवार, 21 एप्रिल 2015 (12:28 IST)

विराट म्हणाला - गरज पडली तर अनुष्कासाठी जीवन देखील देईन

'मी जिशाची प्रेम करतो, गरज पडली तर तिच्यासाठी जीव देखील देईन' हे ते शब्द विराट कोहलीने अनुष्का शर्माबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिले. 'द टेलीग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत विराटने अनुष्का समेत फॅमिलीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. 
 
अनुष्काशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना विराट म्हणाला, "मी आणि अनुष्का आमच्या संबंधांबाबत फारच सावध आहोत. नात्यात कुणाचा ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही. विराट म्हणाला "आमचे प्रेम सामान्य आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्हाला जे योग्य वाटेल तेच करू. या नात्यात कुणाचाच ढवळाढवळ आम्हाला मंजूर नाही. आम्हाला दुसर्‍यांच्या मताशी काहीही घेणेदेणे नाही आहे. आम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे की विरोधकांना कसे चूप करायचे." या दरम्यान विराटने सांगितले की तो अनुष्काशी पहिल्यांदा शँपूच्या जाहिरातीत भेटला होता.  
 
एक मेकवर विश्वास आहे   
एका प्रश्नाच्या उत्तरावर विराट म्हणाल, "आम्ही दोघेही एकमेकांची फार काळजी घेतो. वर्ल्ड कपमध्ये संघाच्या पराजयानंतर लोकांनी अनुष्काचे पुतळे जाळले होते, या गोष्टीमुळे मला फारच दुःख झाले होते. असे करायला नको होते." सांगायचे म्हणजे की वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या संबंधांवर सोशल साईटवर जबरदस्त कमेंट करण्यात आले होते. हे दोघेही क्रिकेट फॅन्सच्या निशाण्यांवर होते. त्यानंतर विराटने मीडिया आणि फॅन्सविरुद्ध आपली नाराजगी दर्शवली होती.