शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Updated : गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (08:39 IST)

अमर शहीद भगतसिंग यांचे 20 अमूल्य विचार

shahid bhagat singh
क्रांतिकारक भगतसिंग हे अष्टपैलुत्वाने समृद्ध होते, ज्यांनी ब्रिटिश राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसून मृत्यूला कवटाळले. येथे वाचा अमर शहीद 
 
भगतसिंग यांचे 20 अनमोल विचार-
 
1. भगतसिंग म्हणतात की वाईट लोक वाढले म्हणून वाईटपणा वाढत नाहीये तर वाईटपणा वाढत आहे कारण चुकीचं सहन करणारे लोक वाढले आहेत.
 
2. माझ्या लेखणीला माझ्या भावनांची इतकी जाणीव आहे की मला प्रेम लिहायचे असले तरी इन्कलाब लिहिलं जातं.
 
3. आपलं आयुष्य आपल्या दमाने चालतं पण अंतिम प्रवास इतरांच्या खांद्यावर पूर्ण होतो.
 
4. जो माणूस प्रगतीच्या मार्गात आडकाठी उभा राहतो, त्याला टीका आणि विरोध आणि पारंपरिक प्रवृत्तीला आव्हान द्यावे लागेल, तरच प्रगती शक्य आहे.
 
5. वेडा, प्रियकर आणि कवी हे एकाच थाळीचे तुकडे आहेत, म्हणजेच सर्व समान आहेत.
 
6. महत्वाकांक्षा, आशावाद आणि जीवनाचा उत्साह आणि गरजेनुसार या सर्वांचा त्याग करणे हाच खरा त्याग असेल.
 
7. अहिंसेला आत्मविश्वासाची ताकद असते आणि विजयाच्या आशेने दुःख सहन केले जाते, परंतु जर प्रयत्न अयशस्वी झाले, तर आपल्याला आपल्या आत्मशक्तीला 
 
शारीरिक शक्तीची जोड द्यावी लागेल, तरच जुलमी शत्रुच्या दयेवर नाही राहणार.
 
8. भगतसिंग म्हणतात की मी एक माणूस आहे आणि जे काही मानवतेला प्रभावित करते, मला त्याने फरक पडतो.
 
9. कोणताही जुलमी सामान्य लोकांना चिरडून त्यांचे विचार मारू शकत नाही.
 
10. भगतसिंग यांच्या मते, कायद्याचे पावित्र्य तोपर्यंतच राखले जाऊ शकते जोपर्यंत ते लोकांची इच्छा व्यक्त करते.
 
11. क्रांती आणि स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि श्रम हा समाजाचा खरा भार आहे.
 
12. सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर कुणालाही खाजगी मालमत्ता मिळणार नाही.
 
13. गरीब असणे हे जगातील सर्वात मोठे पाप आहे का? गरिबी हा शाप आणि दंड आहे.
 
14. जर धर्म वेगळे केले तर आपण सर्वजण राजकारणावर एकत्र येऊ शकतो, जरी आपण धर्मात वेगळे राहिलो तरी.
 
15. क्रांतिकारी विचारांची दोन आवश्यक वैशिष्ट्ये म्हणजे निर्दयी निंदा आणि मुक्त विचार.
 
16. जिवंत राहण्याची इच्छा स्वाभाविकपणे माझ्यातही असली पाहिजे. पण माझे जगणे एका अटीवर आहे, मला कैदेत किंवा तुरुंगात जगायचे नाही.
 
17. कठोरपणा आणि मुक्त विचार हे क्रांतिकारक असण्याचे दोन मोठे गुण आहेत.
 
18. कर्म आणि परिश्रम करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे, कारण यश हे वातावरण आणि प्रसंगावर अवलंबून असते.
 
19. कोणत्याही व्यक्तीने क्रांती या शब्दाचा शाब्दिक अर्थ लावू नये, जे त्याचा गैरवापर करतात, ते त्यांच्या फायद्यानुसार त्याला वेगळा अर्थ देतात.
 
20. भगतसिंगांच्या मते, क्रांतीमध्ये नेहमीच संघर्ष असावा असे नाही, क्रांती हा बॉम्ब आणि पिस्तुलाचा मार्ग नाही.

Edited by: Rupali Barve