बुधवार, 11 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 जानेवारी 2026 (22:03 IST)

घराबाहेर उन्हामध्ये बसलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना कारने चिरडले

Accident, Kollam Accident, KSRTC bus accident in Kollam, അപകടം, കെഎസ്ആര്‍ടിസി ബസ് അപകടം, കൊല്ലത്ത് ബസ് അപകടം
सोमवारी दुपारी घराबाहेर उन्हामध्ये करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांना अनियंत्रित कारने चिरडले. आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर सासू आणि पुतण्या गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील संपूर्ण परिसर एका दुःखद अपघाताने हादरला. सरयालखांसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूर गावात त्यांच्या घराबाहेर उन्हामध्ये बसलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना एका वेगवान आणि अनियंत्रित कारने चिरडले. या हृदयद्रावक घटनेत आई आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर चालकाने गाडी थोड्या अंतरावर पार्क केली आणि घटनास्थळावरून पळून गेला. गाडीतील दुसरा तरुणही गाडी घेऊन पळून गेला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे आणि फरार कार चालकाचा शोध घेत आहे.
Edited By- Dhanashri Naik