गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुवाहाटी , बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (11:13 IST)

महाराष्ट्रात दुष्काळ; आसामात महापुराचे थैमान

महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातले असले तरी देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. आसामात महापुराने पाच जणांचा बळी घेतला आहे.
 
आसाममध्ये महापूराचे गंभीर स्वरुप धारण केले असून लाखो लोक प्रभावीत झाले आहेत.  पूरग्रस्तांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सोमवारी प्रशासनाला दिले आहेत.
 
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक गडद झाली आहे. राज्याच्या पूर्व भागात जनावरांसाठी चारा छावण्या आणि नागरिकांना पिण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळी दौरा करुन मदत जाहीर केली आहे.