शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: लखनौ , सोमवार, 30 जानेवारी 2012 (17:48 IST)

राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावेच - भाजपने केले लक्ष्य

देशभरातील काँग्रेसजन राहुल गांधी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहत असतानाच, भाजपने आज राहुल यांच्या राजकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. राहुल गांधी यांनी एकदा पंतप्रधान व्हावेच, म्हणजे लोकांनाही त्यांची क्षमता कळून चुकेल, अशा शब्दांत भाजपाने त्यांना लक्ष्य केले.

पत्रपरिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपवून काँग्रेसने जुगार खेळला आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. याबाबत रविशंकर यांना छेडले असता त्यांनी राहुल यांना चांगलेच चिमटे काढले. अजूनही दोन वर्षांचा कालावधी आहे. मनमोहनसिंग यांना खुर्चीवरून उतरवून राहुल यांना बसवणे, एवढेच काय ते काँग्रेसला करायचे आहे, त्यांनी लगेच असे करावे, असे रविशंकर म्हणाले.

दरम्यान, यावर भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, अखेर भाजपने सत्य स्वीकारलेच. भाजप राहुल गांधी यांची क्षमता चांगल्यारीतीने जाणून आहे. त्यांच्या सल्ल्यातून म्हणूनच पराभव झळकतो आहे.