‘मेक इन इंडिया’चा 25 सप्टेंबरपासून प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी अभियान ‘मेक इन इंडिया’चा प्रारंभ 25 सप्टेंबरला करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विज्ञान भवनात 25 सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक कंपन्यांचे अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणामध्ये हा उल्लेख करून मेक इन इंडियाने जगावर छाप सोडावी, असे आवाहन केले होते.
'मेक इन इंडिया'च्या यशस्वीतेसाठी मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये 25 सप्टेंबरला हे अभियान सुरू करण्यात येईल.