शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , बुधवार, 26 नोव्हेंबर 2008 (15:53 IST)

माझ्यावर सरकारचे खोटे आरोपः राज ठाकरे

माझ्याविरुध्‍द कट रचून माझी राजकीय कारकिर्द संपविण्‍याचे षडयंत्र राज्‍य सरकारने रचले आहे. माझ्यावर कल्‍याणसह राज्‍यभर याच सुड भावनेने गुन्‍हे दाखल केले गेले असल्‍याचा दावा राज ठाकरे यांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केलेल्‍या याचिकेतून केला आहे.

राज यांना रत्‍नागिरीतून अटक केल्‍यानंतर दिवाळीच्‍या काळात गेल्‍या महिन्‍यात त्‍यांच्‍यावर अनेक गुन्‍हे दाखल केले गेले होते. या संदर्भात राज यांनी सरकारवर आरोप करताना म्‍‍हटले आहे, की मला तुरुंगात डांबून व माझ्या कार्यकर्त्‍यांचे मनोध्‍यैर्य कमी करून मला संपविण्‍याचा डाव सरकारने केला आहे.