बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र, त्याचे नाव माहित आहे का?

webdunia

लंका दहन झाल्यावर हनुमान आपली जळत असलेली शेपूट समुद्राच्या पाण्यता शांत करण्यासाठी पोहचले

webdunia

असे म्हणतात की त्यावेळी त्यांच्या घामातून पडलेला एक थेंब समुद्रातील मोठ्या मासोळीने गिळून घेतला. त्या घामाच्या थेंबामुळे मासोळी गर्भवती झाली

webdunia

मग एके दिवशी अधोलोकाचा राजा अहिरवणाच्या सेवकांनी मासोळी पकडल्यावर पोट कापले तर त्यामधून वानरसारखा माणूस बाहेर आला

webdunia

ते त्या वानराला अहिरावणाकडे घेऊन गेले. अहिरावणाने त्याला पाताल रक्षक नियुक्त केले. हे वानर 'मकरध्वज' या नावाने प्रसिद्ध झाले

webdunia

रावणाच्या सांगण्यावरून अहिरवणाने राम आणि लक्ष्मणाचे अपहरण करून अधोलोकात नेले

webdunia

त्यांना मुक्त करण्यासाठी हनुमान अधोलोकात गेले असताना त्यांची मकरध्वजाशी भेट झाली

webdunia

हनुमानाला बघून मकरध्वजाने आपल्या उत्पत्तीची कथा सांगितली

webdunia

हनुमानजींनी अहिरावणाचा वध करून श्री राम-लक्ष्मणाला मुक्त केले आणि मकरध्वजला अधोलोकाचा राजा म्हणून नियुक्त केले

webdunia